तेल्हारा तालुका सहकार क्षेत्रात होत असलेली घडामोड हे शेतकरी हितांचे की काही करून सत्ता मीळवायचे असा प्रश्न निर्माण होत असताना च तेल्हारा तालुक्यातील सहकार क्षेत्र हे विरोधात बसायला भाग पडल्यामुळे कींवा सहकारातील चिरीमिरी बंद झाल्यामुळे बरेच सहकार नेत्यांची मोठी कोंडी झाली आहे. आता तर हेवेदावे चा कळस खालची पातळी गाठून फक्त एकमेकांनावर कुरघोळी करण्यासाठी बदनाम करण्यासाठी सहकारातील लोकांनी चक्क सोयाबीन , कापूस त्यांच्या शासकीय खरेदी बंद पाळत शेतकऱ्यांना भेटीस धरण्याची काम चालू आहे. मजल पोचलेली आहे. शासकीय खरेदी बंद पडते कशी यामागे सूत्रधार कोण हे जनतेला वेगळे सांगायची गरज नाही.शेतकऱ्यांच्या जीवावर जगणारे सहकार नेते रात्रीच्या पार्ट्यांपासून तर घरातील किराणा भरण्या पर्यंत मजल गेल्याचे चित्र तालुक्याने स्पष्ट पाहले आहे. शेतकऱ्यांसाठी बाजार भाव पाहण्यासाठी आलेले टीव्ही चोरीला जातात काय ? शेतकऱ्यांच्या असलेल्या या संस्था चे लोखंडी कंपाऊड त्यावरचे सत्ताधारी मिळतात कुठे हे जनतेला सर्वश्रुत आहे .काही शेतकऱ्यांच्या संस्था हे सहकार नेत्यांचे ओल्या पार्ट्यांचे अड्डेच बनले होते. त्यासंबंधी ऑफिसला तक्रार करून सुद्धा शेतकऱ्यांच्याच पैशावर त्यांनाही मॅनेज करायचे काम त्यावेळी करण्यात आले .शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या मेहनतीवर उभारलेल्या व सुचालीत असलेल्या या संस्थांमधून मलिदा लाटत दुकाना काढून स्वतःच्या घशात घालण्यासाठी चा कारभार काही काळांपासून चालू होता त्याच्या कितीतरी तक्रार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत मागील पाच सात वर्षात झालेले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती याड मध्ये बांधलेल्या दुकानांमध्ये बांधकामापासून तर दुकान घेण्यापर्यंत झालेला भ्रष्टाचार व त्याच्या तक्रारी सर्व तालुक्यात माहित आहेत.अशा शेतकऱ्यांच्या रक्तपिसासु सहकार क्षेत्र कमाईचे साधन म्हणून पाहणाऱ्या लोकांना जनतेने त्यांची जागा दाखवावी व ती दाखवली सुद्धा मात्र आता शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी समोर येणाऱ्या नाविकांना नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असे मत सहकार क्षेत्रावर लक्ष ठेवत असलेले अनुप पाटील मार्के व्यक्त केले.
सहकार क्षेत्रातील त्यांच्या आव्हानाला शेतकरी जनसामान्य नागरिकांनी साथ देत असल्याचे चित्र तालुक्यात आहे.
