शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे तशेच माजी नगरसेविका विजया दिलीप बोचे व प्रभाग १० मधील नागरिकांनी अकोट नगर परिषद मध्ये २०१८ च्या शासन निर्णयानुसार सरकारी जागेचे अतिक्रमण नियमाकुल करून घरकुल देण्यासाठी आमरण उपोषण केले होते त्यावेळी तात्कालीन उपविभागीय अधिकारी श्री देशपांडे साहेब व मुख्याधिकारी श्री वाहूरवाघ यांनी आश्वासन देऊन मागणी मान्य केली होती परंतु त्यानंतर राजकीय आकाशापोटी पुढे कुठलीही कारवाई त्यावर झाली उलट अकोला दर्यापूर येथे अतिक्रमण जागा नियमाकुल करून त्यानां तिथं घरकुल देण्यात आले ,मग अकोल्यासाठी वेगळा नियम व आकोट साठी वेगळा असा दुजाभाव कश्यासाठी हा प्रश्न लोकांना पडला आहे त्यामुळे पुन्हा आज शासनाला स्मरण पत्राच्या माध्यमातून निवेदन देण्यात सदर निवेदनात प्रभाग क्रमांक १० व अकोट शहरातील इतर भागातील सरकारी जागा अतिक्रमण नियमाकुल करून त्यांनी प्रधानमंत्री क्रमांक २ मध्ये घरकुल आवास योजनेअंतर्गत प्राधान्य देऊन लाभ देण्यात यावा या अकोट नगरपरिषदेच्या जागेवर रहिवासी लोकांची तिसरी पिढी जात आहेत परंतु शासनाची कुठलीही योजना उदा.घरकुल,टॅक्स पावती मिळते त्यावर सुद्धा न,पा, असे लिहून येते ,इत्यादी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही तसेच शासनाच्या २०१८ च्या शासन नियमानुसार सरकारी जागा नियमाकुल करण्याचे अधिकार नगरपरिषद व आपल्या विभागाचा आहे त्यामुळे आमच्या प्रभागातील व आकोट शहरातीलअतिक्रमण जागा नियमाकुल करून देण्यात यावी ५०० स्क्वेअर फुटा पेक्षा जास्त जागेचा शासकीय भरण्यास भरणा भरण्यात आम्ही तयार आहे तरी आमच्या मागण्या मान्य करून न्याय देण्यात यावा अन्यथा पुन्हा मुखाधिकारी यांच्या कार्यालयातआंदोलन उभारण्यात येईल असा प्रशासनाला इशारा देण्यात आला यावेळी दिलीप बोचे,प्रकाश बरेठिया,विलास जाधव,मल्हार गडदे कैलास जाधव,प्रफुल्ल थोरात ,रामदास तायडे,विनोद पोटे,रवींद्र तायडे,गजानन सोनेकर,संतोष तायडे,संजय गाडगे,अनिस खान,शेख रुस्तम,अशोक गटकळ,विजय टकले गजानन चौधरी,सचिन सावंत,भिकू गटकळ, विजय कागळे,गोलू जाधव ,साहिल सराफी ,पप्पू पुंडकर,विजय जायले, ओम हंडाळ, ऋषिकेश हाके, गोरख पवार ,राजू थोरात रवींद्र पत्की इत्यादी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
