सुनील धुरडे:-दानापुर प्रतिनिधि दानापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या आठ ते दहा महिन्यापासून थंड बसतात पडलेल्या हातपंपाचे काम तात्काळ सुरू करा व संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा दिनांक 09.10.2024 रोजी सकाळी 10:00 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ दानापूर येथे आमरण उपोषणास बसण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य गोपाल विखे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की15 वित्त आयोगांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हातपंप मंजूर झाला असून सरपंच यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कोणतीही ठोस कारण नसताना राजकीय द्वेषा पोटी हातपंप थांबवल्याचा आरोप दानापूर ग्रामपंचायत सदस्य गोपाल विखे यांनी केला आहे . दिनांक 09.10.2023 रोजी सामूहिक उपोषणाला बसलो होतो. त्यानुसार गट विकास अधिकारी यांनी दिनांक 19.10.2023 रोजी लेखी आश्वासन देऊन सदर उपोषणाला सोडविले होते, त्यानुसार महसूल विभाग व भूमी अभिलेख कार्यालय तेल्हारा यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून अहवाल सादर केला होता. त्यानुसार दि. 02.11.2023 रोजी मा. गटविकास अधिकारी यांनी सदर हात पंपाचे काम त्वरित सुरू करण्यात बाबतचा आदेश पारित केला. ग्रामपंचायत प्रशासनाने जाणीवपूर्वक आदेशाचा अवमान करून हातपंपाचे काम सुरू केले नसल्याचे गोपाल विखे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदर ग्रामपंचायत च्या हलगर्जीपणामुळे व संगनमताने सदर प्रकरण न्यायालयात जाण्यासाठी संबंधित व्यक्तीला सहकार्य करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ट केले होते. तब्बल 7 ते 8 महिन्यापासून न्यायालयाने कोणताही मनाई हुकूम दिला नसताना वरिष्ठांनी आदेश पत्रद्वारे काम सुरू करण्याचे आदेश देऊन सुद्धा काम सुरू केले नाही. असे असताना न्यायालयाने सदर प्रकरणाचा निकाल दिनांक 02.07.2024 रोजी दिलेला असताना त्यामध्ये संबंधित व्यक्तीच्या फक्त दरवाज्याच्या समोर हातपंप येणार नाही अशा ठिकाणी हात पंप बसविण्याचे आदेश पारित केलेला आहे. सदर जागा ही शासकीय असून त्या जागेवर वादी यांना हक्क किंवा अधिकार सांगण्याचा कोणताही अधिकार नाही. तसेच सदर हातपंप हा दरवाजासमोर येत असेल तरी वादी यांना हात पंपाला विरोध अथवा काम थांबविण्याचा अधिकार नाही.
वि. न्यायालय आदेश लागून तब्बल तीन महिने होऊन सुद्धा हातपंपाचे काम सुरू केलेले नसून तसेच ग्रामपंचायतचे विधीतज्ञ यांनी सदर हातपंपाचे काम आपण करू शकता असे आदेशाचे मार्गदर्शन केलेले असताना सुद्धा सरपंच जाणीव पूर्वक अडाणी पणाचे सोंग घेऊन ग्रामपंचायत विधीतज्ञाचे मार्गदर्शन मान्य न करता वेळ काढू पणा करण्यासाठी व सदर कामांमध्ये दिरंगाई होऊन सदर काम प्रभावित करण्याचे दृष्टीने जिल्हा परिषद विधी तज्ञाचे मार्गदर्शन मागवत आहेत वरिष्ठ कार्यालयाची दिशाभूल करून आपल्या पदाचा दुरुपयोग, कर्तव्यात कसूर करून वरिष्ठ कार्यालयातून आलेल्या आदेशाचे व विद्य. न्यायालयाचे आदेशाचा अवमान करीत असल्याचा आरोप विखे यांनी केला आहे.
प्रतिक्रिया 1)
विघा न्यायालयाच्या आदेशा नंतर सदर प्रकरण हे प्रशासकीय असताना शासकीय अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी हे सुद्धा आपल्या कर्तव्यात कसूर करत आहेत.
गोपाल विखे
ग्रामपंचायत सदस्य दानापुर
प्रतिक्रिया 2)
सदर प्रकरणात मा न्यायालयाने दिलेल्या आदेशावर सरपंच ह्यांनी जिल्हा परिषद यांचे विधीतज्ञ यांचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. जिल्हा परिषद विधीतज्ञ कडून मिळालेल्या मार्गदर्शना नुसार कामाला सुरुवात करण्यात येईल.
संजय ऊईके
ग्राम. विकास अधिकारी, ग्रा.पं.दानापुर.
