तेल्हारा प्रतिनिधी:-
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.
सततच्या पावसाने नुकसान झाल्याने सर्वच पिकांची अधिसूचना काढून शेतकऱ्यांना तात्काळ २५% रक्कम पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी.
सोयाबीनला किमान ७,००० रु हमीभाव देण्यात यावा व हमीभाव प्रमाणेच खरेदी करण्यात यावी व खुल्या बाजारात भाव कमी असल्यास शासनाने खरेदी करावी.
कापसाला किमान १०,००० रुपये भाव देण्यात यावा,खुल्या बाजारात भाव कमी असल्यास शासनाने कापूस खरेदी करावा.
मागील वर्षीची अतिवृष्टी व भावांतर योजनेचे पैशे शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावे.
सततच्या पावसांमूळे व अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या पिकांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी.
संपुर्ण अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा तशेच अकोला जिल्ह्यात जुलै,ऑगस्ट मध्ये सतत पाऊस व अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन,कापूस,तूर,मुंग या पिकांची वाढ होऊ शकली नाही व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या कारणाने पिकांमध्ये घट होणेच आहे यासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष अकोला जिल्ह्याच्या वतीने आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
